Saturday 28 February 2015

Excerpts from Sadguru Aniruddha Bapu's Thursday Discourse (26.02.2015)

शिवपंचाक्षरी मंत्र आपण म्हणतो. पण आपला गुरूवारी आवाज लहान असतो. मग हळू हळू आवाज वाढत जातो. आणि मग आज जसा झाला तसा आवाज खुप चांगला असतो. कारण आम्हाला वर्षातुन एकदाच आठवण येते कि वालुकेश्वर येतं! मग आपण म्हणुया हे स्तोत्र. हे स्वत: नंदी ने लिहीलेलं स्तोत्र आहे..
पण प्रत्येक नाही जमलं तरी एका श्रावणी सोमवारी पंचाक्षरी मंत्र बोललात, तर काय झालं??
आपण जो जप करताना counter (खुण, चकती) वापरतो तो आम्ही डॉक्टर वापरायचो.
सर्व मंगल मांगल्ये हा जप 108 वेळा म्हणायला जास्तीत जास्त 24 मिनिटे लागतात..मग ट्रेन मधे कधी तरी हे पण करा नं..इतर गोष्टी ही पहा..पण कधी हा जप 108 वेळा करायला काय हरकत आहे? दररोज नाही तरी कधी तरी एकदा?/
श्रावणी सोमवार 4 असतात पण त्यातल्या एकदा तरी पंचाक्षरी मंत्र म्हणुया..जास्त नाही पण जमेल तेवढा..पण तेवढा ही आपल्याकडे वेळ नसतो. मान्य आहे माणुस आहे की विसरतो. पण वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला पुर्ण वर्षात काय करायचं ते लिहून घ्या..
आता डायरी वापरणं सोडुनच दिलं आहे. One Page डायरी ही आपण वापरत नाही. किचनच्या कॅलेंडर वर आपण दुधवाला आला कि नाही, फुलपुडी आली कि नाही हे लिहायला वापरतो. कारण इथे पैशाचा भाग येतो.
माणुस हा काही न काही विसरू शकतो त्या साठी डायरी करण्याची सवय लागली पाहिजे.
मग कधी तरी मधेच शिवपंचाक्षरी मंत्र म्हणायला हरकत नाही.
आधी आपण आराधना ज्योती चं पुस्तक वाचायचो. पण आता कोण कोण ते वाचतात? पुर्ण नाही, तरी काही तरी त्यातलं वाचलं, तर काय बिघडलं??
जे आवडेल ते नक्कीच करा.
तहान लागल्या नंतर विहीर खणायला काय अर्थ आहे??
मग अधुन मधुन अशी मंत्र, स्तोत्र म्हणायला काय हरकत आहे?? नुसतं Unconditional (बिनशर्त) प्रेम म्हणुन. काही मागण्यासाठी नाही..
हे आपण जे मंत्र म्हणतो ते आधी कोणी तरी खुप आधी म्हटले असतात. तर ते आपल्या साठी फायद्याचं असतं!
हे वर्ष प्रेमाचं आहे, तर देवावरचं प्रेम ही 15% वाढवा..
आज तरी 26. मग पुढच्या गुरूवारी 5 मार्च, मग तेंव्हा काय आहे होळी..तो कुठे होतो, तर साई निवास ला. का? तर साई बाबा, मुर्ती रुपाने तिथे आले होते. मग त्याच्या नंतरच्या गुरूवारी म्हणजे 12 मार्चला sharp (ठीक) 7.30 च्या आधीच मी (बापू) बोलायला चालू करणार आहे. आणि त्या दिवशी तुम्ही "सर्वानी, श्री श्वासम् चा उत्सव कसा असणार आहे ते अनुभवायचं आहे. त्या उत्सवात सहभागी व्हा..आणि साधारण तेंव्हा 9.45 पर्यंत बोलणं चालू असेल. मग 2.30 तास एका जागी कसं बसणार? तर मधे ब्रेक मिळणार नाही आणि मी ही (बापू) घेणार नाही.. मग मधे माझ्या मनाला वाटलं तर मधेच 5 मिनिटांची सुट्टी देईन..
श्री श्वासम् चा आनंद जीवनात उतरवायचा आहे. आणि त्यातलं किती महत्वाचं आहे ते त्या दिवशी मी कव्हर करणार आहे. अवधुतचिंतन सारखं ह्या श्री श्वासम् चं पुस्तक येणार आहे..
श्री श्वासम् हे जीवनातलं सर्वात मोठं Gift आहे जे मी तुम्हाला देतोय.
तुम्हाला सर्वोच्च तिर्थक्षेत्र दिलं ते 'गुरूक्षेत्रंम'
तुम्हाला एक सर्वोच्च धाम दिला तो म्हणजे 'प्रथमपुरूषार्थ धाम'.
आणि अजुन एक गोष्ट आहे ते 'अमळनेर ला जे चालू आहे ते..नक्की काय ते नाही सांगत आत्ताच..
अग्रलेखात जी नावं येतात त्यांचे पंथ असलेले लोक, आजही त्यांच्या गुप्त उपासना चालुच आहेत..त्यातली बिजॉयमलाना ही, सॅथाडॉरिना बनुन फिरतेय तरी इतरांना कळत नाही आहे, कि ती बिजॉयमलाना आहे..
आपल्या जीवनात आपल्याला अनेक वाईट गोष्टींचा नाश करायचा आहे तर हा श्री श्वासम् जीवनात आपल्याला उतरवला पाहिजे..
श्री श्वासम् ही सर्वोच्च भेट आहे जी बापू आपल्याला देत आहेत. ह्यात माझे असे काहीच नाही. जसा मी ग्रंथात दिला आहे तसाच..मग तुम्ही म्हणाल की तुमचं काही नाही तर मग काय समजायचं?? सर्वात important (महत्वाचं) म्हणजे "मी इथे काही द्यायला बसलो नाही, हे माझ्या मनातच नाही आहे."
आई जे दुध तयार करते ते बाळासाठी तयार करते. ते दुध त्या बाळासाठी भीक नाही. आणि हेच  आपलं चण्डिका कुलाशी असलेलं नातं आहे.
श्री श्वासम् म्हणजे "The Healing code" (निरोगी करणारा) मग त्या दिवशी तो श्री श्वासम् समजुन घ्यायचा आहे. आणि तो accept करायचा (स्विकारायचा) आहे त्या उत्सवात..
बापू आमचं ठीक आहे पण आमच्या नंतरच्या पिढीचं काय?? ते ही त्या दिवशी कळेल. मग आम्ही त्या दिवशी काय करायचं????
त्या दिवशी प्रत्येकाने एकच करायचं आहे..कि जमलं तर कमीत कमी एक वेळ हनुमान चालिसा करून या..कितीही करा, पण मोजू नका. स्वत:च्या मनाला ही कळू देऊ नका, कि किती केलंय. का करायचं? तर बापूंनी सांगितलं म्हणुन..मला 'का' असं विचारलेलं आवडत नाही. हे 2007 ला मी सांगितलं आहे..कि मी उत्तर देऊ शकणार नाही..
कोणी येताना हनुमान चालिसा म्हणायला विसरलात तर इथे येऊन म्हणा किंवा घरी जाताना म्हणा.. त्या दिवशी रात्री 12 पर्यंत म्हणा..
त्यात काही तरी अधिक चांगलं मिळेल..त्या दिवशी कोणाची परिक्षा आहे तर येऊच नका..त्याच्या सी.डी. दर वर्षी सगळ्या केंद्रांवर लावता येईल..दर वर्षी एकदा तरी ही सी.डी. केंद्रावर लावलीच पाहीजे..
श्री श्वासम् हे आपल्या भारत वर्षात सत्य युगामध्ये आपलं जीवन सुखी करण्या साठीची एक गोष्ट होती. आणि ह्या युगात आपल्या कडे जगदंबेच्या कृपेने येत आहे, तर त्याचा नक्की उपभोग घ्या..मग आपल्याला पुढच्याच्या पुढच्या गुरूवारी भेटायचं आहे..
2015 साल हे अधिक गोष्टींसाठी वेगळं वेगळं आहे..हे लक्षात घेऊया..
पुढच्या गुरूवारी श्री श्वासम् च्या बरोबर मी 'श्री सुक्ता'चं ही प्रवचन करणार आहे. मग ह्या श्री सुक्तावर बोलायला चालू करणार आहे. हे असं महान सुक्तं आहे, ज्यात काय नाही, असं नाही! त्यात 15 श्लोक आहेत तरी ह्यात सगळं काही आहे. त्यात सगळं science (विज्ञान) आहे. जे अजुन माहीत पण नाही, असं विज्ञान त्यात आहे. पुढच्या गुरूवारी योगिंद्रसिंह श्री सुक्ताचं पठण करतील.
एक गुरूवार योगिन्द्रसिंह आणि एक गुरूवार विशाखावीरा असं सुक्त पठण करतील आणि दोन्ही ही चाली वेगळ्या असतील

No comments:

Post a Comment